PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

मुजोच्या गटाला दिलेल्या सर्व कामांची तात्काळ चौकशी करा कारवाई न …


 

 

     

   

      गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४:-   येथील प्रतिष्ठित, लाचार  होऊन  पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला  विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे  प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे,  विभागीय  युवा अध्यक्ष  निरज कांबळे ,  महिला प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई पाटील ,  महासचिव ईश्वर मोरे , कार्याध्यक्ष एच.बी उराडे ,  गडचिरोली विधानसभा प्रमुख पुरुषोत्तम सलामे, यांनी मुख्यमंत्री ,  उपमुख्यमंत्री , जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे . .
  या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुकुंद जोशी यांनी.... स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून SNCU अंतर्गत २०१२ ते २०१८  मध्ये  जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यस्त्रोतांने  कर्मचारी पुरवठा करण्याचे काम केलेले आहे.  तसेच गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात  २०१९ पासून २०२४  पर्यंत काम सुरू आहे. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ, ईएसआयसी आणि करारानुसार बॅंक खात्यात पैसे जमा केले नाही.   नियमानुसार ई टेंडर प्रक्रिया करणे आवश्यक होते . परंतु केवळ कोटेशनवर  लाखो रुपयांचे कंत्राट देण्याचे काम संबंधित प्रशासकिय अधिकारी आणि  लिपीक  यांनी केले आले.   संबंधित व्यक्तीला धोबीचेही कंत्राट  विना टेंडर दिले आहे  . प्रत्यक्षात काम न करता  जिल्हा  सामान्य रुग्णालयातील  तसेच महिला व बाल रुग्णालयातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या  डोळ्यात धुळ झोकून स्वताच्या स्वार्थासाठी लाखो रुपयांची उचल करून  शासनाला  लाखो रुपयांचा चुना लावला आहे .  विना टेंडर सतत काम  देणाऱ्या   प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपीकावर  उचित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य संचालक, आरोग्य सचिव ,  जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली , जिल्हा पोलिस अधीक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी,  उपसंचालक आरोग्य सेवा संचालनालय नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे केली आहे. अशी माहिती गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर


उप मुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्यात

 

 

गडचिरोली / दि.5: उप मुख्यमंत्री अजित पवार 06 सप्टेंबर 2024 रोजी  गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील.
दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहेरी येथे आगमन. सकाळी 11.15 वा. राजे धर्मवीर शाळा, रेड्डी कॉम्पलेक्स, अहेरी रोड, नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकम. सकाळी 11.45 वा. सावरकर चौक, आलापल्ली येथे आदिवासी बंधू-भगिनींमार्फत पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. वन विभागाचे मैदान, आलापल्ली येथे जनसन्मान यात्रा- शेतकरी व लाडक्या बहिणींशी संवाद. दुपारी 2.15 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. दुपारी 3.20 वाजता नागपूरकडे प्रयाण.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

जिल्हा नियोजन बैठकीत विकास कामांसाठी मंजूर निधी तत्परतेने खर्च करण्याचे …



          जिल्हा नियोजनच्या खर्चाचा आढावाा.
100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना.

 

     

      गडचिरोली/ दि.5: जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने विकास कामांसाठी मंजूर केलेला निधी तत्परतेने खर्च करावा तसेच दुर्गम भागात विजेची समस्या निकाली काढण्यासाठी विद्युत विभागाने जिल्हा नियोजनच्या निधीतून किमान 100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन अंतर्गत 2023-24 च्या खर्चाचा व 2024-25 च्या विकास कामांचा आढावा श्री दैने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय सचीव विद्याधर महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रमेश यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी दैने यांनी पुढे सांगितले की गडचिरोली हा जंगलव्याप्त आणि दुर्गम भाग असल्याने येथे विजपुरवठाच्या अनेक समस्या आहेत. वीज उपलब्ध करण्यासाठी वीद्युत निर्मिती संच उभारणे, दुर्गम भागात दुरवर वीजपुरवठ्याची लाईन टाकणे, बांधकाम करणे, वनक्षेत्राकरिता परवानग्या व इतर अडचणी सोडवणे, त्याची देखभाल दुरूस्तीसाठी कायम मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे, सार्वजनिक वीज वापरासाठी रकमेची तजवीज करणे या सर्व बाबींवर सौर विद्युत यंत्रणा हा सर्वोत्तम पर्याय असून त्याच्या वापरारतून ज्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहचली नाही किंवा वीजपूरठ्यासाठी नेहमीच समस्या उदभवतात त्या सोडवण्यासाठी सौर यंत्रणा टप्प्याटप्प्यात बसवून दुर्गम भागातील वीजपुरवठ्याचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 
पालकमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले यांनी जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री यांची सदैव आग्रही भूमिका असल्याचे त्यासाठी पालकमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. 
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधांचे निर्माण करणे, प्रत्येक शाळेत सिसिटीव्ही कॅमेरे लावणे, टेक्नोसेवी व डिजिटल शाळा तयार करणे, शालेय क्रिडांगणाचा विकास करणे, कौशल्य विकास विभागाने रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना सक्षम करणे, जिल्ह्यात पर्यटनला चालना देण्यासाठी वन विभागाने विश्रामगृह बांधून पर्यटकांच्या राहण्याची सोय करणे आदी सूचना दिल्या. एटापल्ली वनविभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन रस्ते बांधकामासंबंधी तक्रारी न करता नागरिकांची सोय लक्षात घेवून समोपचाराने मार्ग काढण्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नरसिंहपल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत बांधकामाची आवश्यकता असल्याचे सांगून निवासस्थानाऐवजी दवाखाना बांधण्याकरिता प्राधाण्याने निधी वाढवून देण्याची विनंती केली.
    यावेळी कृषी, आरोग्य, वन, जलसंधारण, शिक्षण, नगरविकास, महिला व बालकल्याण, आदी विविध यंत्रणेच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत 340 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा सर्व निधी 100 टक्के खर्च करण्यात आला आहे. तर 2024-25 साठी 406 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून 135 कोटी 32 लाख रुपये निधी बीडीएस प्रणालीवर उपलब्ध झाल्याचे व त्यातील 54 कोटी 75 लाख निधी 31 ऑगस्टपर्यंत यंत्रणांना वितरीत केला असल्याचे आणि त्यापैकी 19 कोटी 66 लाख रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी सादर केली. 
    बैठकीला जिल्ह्यातील सर्व संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधुन अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती …


 

जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधून अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती

 

 

      गडचिरोली/दिनांक,5: जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अतर्गत सन २०२३ मध्ये पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करून पुर्ण माहिती असलेल्या एकूण २५१ उमेदवारांचा अंतिम जेष्ठता सुची तयार करून जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली होती. या कार्यालयाचे पत्र दिनांक २२ ऑगस्ट २०२४ राजा प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यतच्या अनुकंपाधारक उमेदवारांचे दस्ताऐवजांची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार याव्दारे आवाहन करण्यात येते की. दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने समुपदेशन घेण्यात येणार आहे. तरी प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सुचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांसह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे समुपदेशानाकरीता उपस्थित राहावे. 
प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाव्दारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येत असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला / भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 4, 2024   

PostImage

पोस्टे अहेरी पोलिसांनी देशी व विदेशी दारूसह एकुण 9,35,500/- रुपयांचा …


   
                                                             


 

  गडचिरोली/ दिनांक, 03 :-  गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. दिनांक 02/09/2024 रोजी बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये व पोस्टे हद्दीत अवैधरित्या चालणा­या धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 02/09/2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार हे पोस्टेच्या स्टाफसह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मौजा कोलपल्ली तालुका अहेरी येथील आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तह. अहेरी, जि. गडचिरोली हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यामध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या एकुण 10,000 सिलबंद निपा किंमत 8,00,000/- रुपये, किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या एकुण 80 नग बॉटल किंमत 24,000/- रुपये, हेवड्र्स 5000 स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या 230 नग सिलबंद बॉटल किंमत 57,500/- रुपये, ऑफिसर चॉईस कंपनीच्या 1000 मिली मापाच्या 54 नग सिलबंद बंपर किंमत 54,000/- रुपये असा एकुण 9,35,500/- (अक्षरी नऊ लाख पसतीस हजार पाचशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोउपनि. सागर माने, पोस्टे अहेरी यांचे लेखी फिर्यादीवरुन पाहिजे असलेले आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम, वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट, वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार, वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तालुका अहेरी, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे अहेरी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. सागर माने, पोउपनि. अतुल तराळे, पोहवा/1850 निलकंठ पेंदाम, नापोअं/5337 हेमराज वाघाडे, पोअं/5373 शंकर दहीफळे, मपोअं/8064 राणी कुसनाके, चापोहवा/2796 दादाराव सिडाम यांनी पार पाडली.


PostImage

P10NEWS

Sept. 4, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन.


 

 

 

             गडचिरोली दि.३: जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज व निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी तळमजल्यावर दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी संजय दैने यांनी  दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून सदर कक्ष  स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या लिफ्ट मशीनचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होईपर्यंत दिव्यांग अभ्यागत कक्ष तळमजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या समोरील कक्षात स्थापन करण्यात आला असून या कक्षाचे नोडल अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार अमोल गव्हारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

 

 

 


PostImage

P10NEWS

Sept. 3, 2024   

PostImage

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती करिता अल्पसंख्याक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित. P10NEWS


 

       सन 2024-2025 परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 

        गडचिरोली/ दि.02: अल्पसंख्यांक विकास विभाग अंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२०२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेच्या अटी व शर्ती- विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदयातील व महाराष्ट्र राज्याया रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षीक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडीलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. पदव्युत्तर पदवीसाठी ३ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो. तथापि कोणत्याही परिस्थितीत २ वर्षापेक्षा कमी नसावा. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल. एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटूंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतीम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटूंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा, परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी. शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्या करीता सर्वकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बांधकामे) कार्यासनामार्फत दि.३०.१०.२०२३ रोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्या संदर्भात दि.९.११.२०२३ रोजी शासन शुध्दीपत्रक निर्गमित केलेले आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांस पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणीक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२३.११.२०२३ मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन पुरकपत्र क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२०.६.२०२४मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन निर्णय क्र.सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे, दि.२५.७.२०२४ मधील अटी शर्ती लागू राहतील. अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिराती प्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील. सदरील वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. ०६/०९/२०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा. ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्यास त्याबाबत माहिती देण्यात येईल. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी.
योजनेतील लाभाचे स्वरुप - परदेशातील शैक्षणिक संस्थेने Offer Letter मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी Economy Class विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तीक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शूल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकीट इ. तपासून विदयार्थ्याच्या बैंक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल.  विदयार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी USD१५४०० तर युकेसाठी GBP९९०० इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विदयार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तीक खात्यामध्ये जमा केला जाईल.  विद्यार्थ्यास खालील बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यु.एस. ए. व इतर देशांसाठी (यु.के वगळून) १५०० यु. एस. डॉलर आणि यु.के. साठी १,१०० जी.बी.पी इतका निर्वाह भत्ता/ इतर खर्च/आकस्मिक खर्च म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 2, 2024   

PostImage

पोषण आहारात अभिमानास्पद कामगिरी करा. - महिला बाल विकास मंत्री …



   

          राज्यस्तरीय पोषण माह शुभारंभ.
    नवीन पीढी घडविण्यात अंगणवाडी सेविकांचा महत्वाचा वाटा
    लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे नियमित सुरू राहील

 

           गडचिरोली दि.1 : प्रत्येक बालक हा सुदृढ व्हावा या उद्दिष्टातून गरोदर व स्तनदा मातांपर्यंत योग्य पोषण आहार पोहचूवन अभिमानास्पद कामगिरी करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना केले.
महिला व बाल विकास विभागाच्या पोषण अभियाअंतर्गत राज्यस्तरीय पोषण माह चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, उपायुक्त संगिता लोंढे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीतून सुदृढ नवीन पिढी घडविण्यात महत्वाचा वाटा अंगणवाडी सेविकांचा माध्यमातून होत आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बाराही महिने नियमितपणे चांगले काम करत असल्याचे सांगतांना कोविड कालावधीत केलेले काम आणि मुख्यमंत्री योजनेत सर्वाधिक अर्ज नोंदणी केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे निरंतर सुरू राहणार असून त्याला कोणतीही मुदत ठरवून दिलेली नाही. अर्ज भरण्यासाठीचा देय भत्ता ऑक्टोबर महिण्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
महिलांचा सन्मान व्हावा म्हणून बालकाच्या नावापुढे प्रथम त्याच्या आईचं नाव मग वडिलांचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय मे-2024 मध्ये देशात सर्वप्रथम महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुपोषणमुक्तीसाठी चांगले उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे विशेष अभिनंदन केले. पोषण माहांमध्ये पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा नंबर आणावा यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने नावीन्यपूर्ण काम करण्याचे त्यांनी सांगितले.  दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना खनिकर्म निधीतून सायकल मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी महिलांना सक्षम करणे ही शासनाची भूमिका असून यासाठी विविध क्रांतीकारक योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांना मोफत उच्च शिक्षण आदि योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ आहार आरोग्यासाठी महत्व आणि फोर्टीफाईड फुड योजनेबाबत त्यांनी माहिती दिली.
आयुक्त कैलास पगारे यांनीही सुपोषीत बालक संकल्पनेवर शासनाच्या योजनांची माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून पोषण आहार योजना व कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी विविध योजनेंतर्गत लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.
*नवेगाव अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन*
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नवेगाव अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. इतकी सुसज्ज इमारत राज्यात प्रथमच पाहत असल्याचे सांगून त्यांनी अंगणवाडी इमारतीचे कौतुक केले.


PostImage

P10NEWS

Aug. 31, 2024   

PostImage

NAXAL NEWS:- एका जहाल माओवाद्यांने केले गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ …



                                                                        
                


.    शासनाने जाहिर केले होते एकुण 06 लाख रूपयांचे बक्षिस.

 

 

   

        गडचिरोली/ 30:- शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 673 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी जहाल माओवादी नामे 1) केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम, एरिया कमिटी सदस्य, टेकनिकल टीम- वेस्ट सब झोनल ब्युरो, वय 42 वर्ष, रा. कोसमी नं. - 1 ता. धानोरा, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

1)    केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम
    दलममधील कार्यकाळ

.    सन 2002 ते 2007 पर्यंत टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत. 
.    2007 ते 2012 टेकनिकल टिम नॉर्थ गडचिरोली डिव्हीजन मध्ये कार्यरत.
.    2012 ते 2020 पर्यंत प्लाटुन 15 (टिपागड एरिया) येथे कार्यरत.
.       2020 मध्ये एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली तेव्हापासुन आतापर्यंत 
   टेकनिकल टिम-वेस्ट सब झोनल ब्युरो येथे कार्यरत.  
 
    कार्यकाळात केलेले गुन्हे

    चकमक- 18 
.    सन-2004 मध्ये मौजा मानेवारा व मौजा बंदुर अशा दोन जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. 
.    सन -2014 मध्ये मौजा बोटेझरी जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होता
.    सन -2016 मध्ये मौजा दराची जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
.    सन-2019 मध्ये मौजा गांगीन जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
.    सन-2020 मध्ये मौजा किसनेली जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
.    सन-2021 मध्ये मौजा कोडुर (माड एरीया) (छ. ग.)जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
    जाळपोळ -02, खुन:-08, ईतर-06 एकुण-34

 


    आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

    गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे. 
    दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.
    दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. 
    वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
    वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.
    गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

 

    शासनाने जाहिर केलेले बक्षिस. 


    महाराष्ट्र शासनाने केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याचेवर 06 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

    आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

    आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 25 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. जसवीर ंिसंग, कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विश्वंभर कराळे, प्रभारी अधिकारी पोमके सावरगाव यांनी ही कामगिरी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

KABIR NETWORK

Aug. 28, 2024   

PostImage

Gadchiroli News: विहान फाऊंडेशनच्या तरुणांनी महाराष्ट्र गडचिरोली पोलीस भरती जिंकली


Gadchiroli News: जुलै 2024 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीसाठी रणजीत सर मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आणि विहान फाऊंडेशन संचलित स्वराज व वीरांगना अकादमीने 450 उमेदवारांना मोफत शारीरिक शिक्षण व शिकवणी दिली. या विशेष योजनेचा लाभ घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींनी पोलीस भरतीमध्ये उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे.

 

नवीन महाराष्ट्र पोलिसांची निवड

या शिक्षण व प्रशिक्षणामुळे 150 पेक्षा जास्त उमेदवारांची महाराष्ट्र पोलिसांत निवड झाली आहे. त्यांच्या यशस्वीतेचा उत्सव 18 ऑगस्ट 2024 रोजी सेमना हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गडचिरोली नगरपरिषदेचे माननीय मुख्याधिकारी सूर्यकांत पिंडुरकर, चेअरमन कबीर यशोदा धर्माजी निकुरे, रणजीत सर, आकाश संगनवार, दिनेश देशमुख, मेनीराम सर आणि विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 

 

विहान बहुउद्देशीय संस्थेचा योगदान

विहान बहुउद्देशीय संस्था गरीब, सुशिक्षित, बेरोजगार आणि गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी विविध योजना राबवत आहे. संस्थेच्या पहिल्या टप्प्यात पोलीस भरतीसाठी 450 मुला-मुलींना मोफत शिक्षण दिले गेले. याचा परिणाम म्हणून 150+ नवीन महाराष्ट्र पोलिसांची निवड झाली आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील यश: एक आदर्श उदाहरण

हे यश गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी केलेल्या कठोर परिश्रमांचे आणि विहान बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नांचे प्रमाण आहे. यामुळे स्थानिक युवक-युवतींना उत्तम संधी मिळाल्या आहेत आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक आदर्श उदाहरण स्थापन झाले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 28, 2024   

PostImage

पोलिस आले कोंबडे धरून पळा...


 

 

कोंबडा बाजारावर छापा; १५.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

 मुलचेरा: तालुक्याच्या मुत्परतली जंगल का रसरात अवैधरीत्या कोंबड्यांच्या झुंजी व पैजा लावल्या जात असल्याची माहिती मुलचेरा पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी धाड टाकून १५.९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी २२ जणांना ताब्यात घेण्यात आले.

 

आपापल्ली नाल्याच्या जंगल परिसरात अवैधरीत्या कोंबडा बाजार भरवून झुंजी लावत असल्याच्या माहितीवरून २५ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता कारवाई करण्यात आली. सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत ही कार्यवाही चालली. पोलिसांनी कोंबडा बाजारातून १५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ३० मोटारसायकली, ४५ हजार रुपयेकिमतीचे १३ मोबाइल, १४ हजार ७५० रुपयांची रोकड, १ हजार ९५० रुपयांचे ५ नग झुंजीचे कोंबडे, लोखंडी धारदार व टोकदार तात्या २० नग, याची किंमत १ हजार रुपये आहे. ५०० रुपये किमतीचा मोजमाप काटा, असा एकूण १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

सात आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे

 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एकूण २२ आरोपींपैकी ७ आरोपी हे किरकोळ संघटित टोळ्या करून सट्टा, जुगार चालवितात. तसेच त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे. म्हणून आरोपीविरोधात आरोपीविरोधात कलम ११२ त्या भा. न्या. सं. २०२३, सहकलम १२ (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद केला.

 

 


PostImage

P10NEWS

Aug. 27, 2024   

PostImage

बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली …


 

    


          गडचिरोली/ दि.26: आपल्या आजुबाजुला बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत मदत कुठुन मिळवून देता येईल, याकरिता कोठे संपर्क करावा, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. अशा संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरीता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत/ संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईनसेवा 1098 संपुर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. ही हेल्पलाईन सेवा दररोज २४ तास उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वत: घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर दूरध्वनीद्वारे गरजू बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाद्वारे करण्यात आले आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 24, 2024   

PostImage

रोजगार हमी योजनेतून २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिन रोजगार निर्मिती …


 
      मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण
     १०९ अमृत सरोवर पुनरूज्जीवीत

 

       गडचिरोली दि. २४ :  जिल्ह्यात चालु आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत आतापर्यंत २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली आहे. वित्तीय वर्ष 2024 - 2025 साठी 1 लक्ष 32 हजार नोंदणीकृत मजुरांकरिता 28 लक्ष14 हजार मनुष्यदिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यातुलनेत ९०.६९ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतरावरही नियंत्रण आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे.
    रोजगार हमी योजनेतून 70 कोटी 92 लक्ष 51 हजार रुपये मजुरीचे वाटप बँक व पोष्टखात्यातून करण्यात आले आहे.एकूण रोजगार निर्मितीतून 8.96 टक्के अनुसुचित जमाती आणी 37.01टक्के  अनुसुचित जाती प्रवर्गाकरीता मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे तर महीलांकरीता 48.60 टक्के मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे. एकूण झालेल्या कामांपैकी 30.62 टक्के इतका खर्च कृषि व कृष‍ि आधारीत कामावर करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीचे स्वरुप पाहता आगामी कालावधीत महाराष्ट्र गा्रमीण रोजगार हमी योजनेवर मजुरांचे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे गृहित धरुन त्यानुसार वार्षीक नियोजन करण्यात आलेले आहे. अकुशल हातांना कामे देण्याबरोबरच कायम स्वरुपी मत्ता निर्मीतीचे देखील लक्ष ठेवण्यात आलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त 75 अमृत सरोवर निर्मीतीचे उद्दिष्ट जिल्ह्यास दिलेले होते. गडचिरोली जिल्ह्याने 109 अमृत सरोवर पुनरुज्जिवनाचे काम पुर्ण केलेले आहे. जिल्ह्याने पुर्ण झालेल्या अमृत सरोवर स्थळी 1 मे, 2024 व 15 ऑगष्ट, 2024 रोजी विविध कार्यक्रम राबविण्यासह ध्वजारोहण करण्यात आले. 21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस सुध्दा अमृत सरोवरांवर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक अमृत सरोवर टिकाऊ व दिर्घकालीन संपत्ती निर्मीतीचे मानाचे प्रतिक मानल्या जाईल. प्रत्येक अमृत सरोवर हे परीपक्व व अनंतकाळ टिकणारे असल्यामुळे भविष्यात पाणी सिंचन, मत्स्यपालन, जलपर्यटन आणि इतर कामांसाठी वापरुन उदर निर्वाहाचे साधन असेल त्या परीसरातील सामाजिक सम्मेलन बिंदू म्हणुनही आदर्शाचे ठिकाण असेल.
जिल्ह्यात "मेरी मिट्टी मेरा देश" उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त देशी झाडांची लागवड करण्यासह शिलाफलक तयार करुन पंचप्रण शपथ घेण्यात आली. "एक पेड माँ के नाम" अभियान सुध्दा जिल्ह्यात जनसहभागातून यशस्वीरित्या राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दैने यांनी कळविले आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 22, 2024   

PostImage

MUKHYAMANTRI YOJANA : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज 46 हजार 261 …


 

   

       मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज मंजुरीत गडचिरोली राज्यात आघाडीवर
46 हजार 261 अर्ज मंजूर

 

           गडचिरोली दि. 21 : मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत 46 हजार 261 अर्ज मंजूर करून गडचिरोली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा (53 हजार) आहे. 
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 46 हजार 261 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यात गडचिरोली तालुक्यात 2736, मुलचेरा-2605, आरमोरी-4301, धानोरा-2075, भामरागड-1546, एटापल्ली-4261, चामोर्शी-6445, देसाईगंज-6146, अहेरी-3274, सिरोंचा-8857, कुरखेडा-2421, कोरची-1594 अर्ज मंजूर करण्यात आली आहे.
दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे.
योजनेचे स्वरुप: ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल. या योजनेकरिता राज्य शासनातर्फे १०० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपयांच्या लाभ देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग तसें राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष: ज्या नागरिकांची ३१ डिसेंबर २०२३ अखेर वयाची ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत, असे नागरिक या योजनेकरिता पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधारकार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास ओळख पटविण्यासाठी इतर स्वतंत्र ओळख दस्तऐवजही ग्राह्य धरण्यात येणार येईल.
लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करावे. निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असणार आहे. अर्जदारांने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. मात्र दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे आदीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे २ छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे.
६५ वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी. चौक या पत्त्यावर सादर करावे, तसेच तालुका स्तरावर पंचायत समिती मध्येही अर्ज करता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे. 


PostImage

P10NEWS

Aug. 22, 2024   

PostImage

बहुजन समाज पार्टीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहन कुमारी मायावती …


 

       बहुजन समाज पार्टीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहन कुमारी मायावती जी यांच्या आदेशानुसार 21 ऑगस्टला 2024  संपूर्ण "भारत बंद" च्या हाकेला साथ देण्यासाठी गडचिरोली जिल्हा कडकडीत बंद केला.

      एसी एसटी समाजाने एकत्रित गडचिरोली जिल्हा बंद करून प्रस्थापित सरकारला येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे दाखवून दिले. अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवुन एकजुटीची ताकद दाखवणार.

 

      गडचिरोली/21:- एसी एसटी समाजाच्या आरक्षणात उपवर्गीकरण व क्रिमीलेयर लागु करण्याचे षडयंत्र सुप्रीम कोर्टाने केला त्याचा विरोधात बहुजन समाज पार्टीने कडकडीत बंद करून आपला विरोध करुन न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केले. भारत सरकारने 9 सुची मध्ये संसदेत ठराव पारित करून एसी एसटी च्या आरक्षणाला सुरक्षित करण्याची मागणी व एसी एसटी समाजाच्या आरक्षणात उपवर्गीकरण व क्रिमीलेयर लागु करु नये असे निवेदन महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत देण्यात आले. यापूर्वी  एससी एसटी आरक्षणात वर्गवारी व क्रिमिलिअर निर्णयाच्या विरोधात भारत बंद . गडचिरोली - एससी. एसटी आरक्षणात वर्गवारी व क्रिमिलिअर निर्णयाच्या विरोधात वतीने गडचिरोली शहर कडकडीत बंद पाडण्यात आला. सकाळी ९ वाजता पासुन शहरातील सर्व दुकाने , शाळा महाविद्यालय
 बंद पाळण्यात आल्यानंतर गांधी चौकात आदिवासी समाजाचे नेते माधव गावढ यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली, यांनी बहन कुमारी मायावती जी यांच्या "भारत बंद" ला जिल्ह्यातील आदिवासी व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.  मा मंदीप गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली, यांनी उपवर्गीकरण व क्रिमीलेयर यावर मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाची मागणी नसतानासुद्धा आदिवासी समाजाची उपवर्गीकरण व क्रिमीलेयर का लागु करण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मा. रमेश मडावी प्रदेश सचिव बसपा गडचिरोली, यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप घेतला व सविस्तर भारत बंद विषयी माहिती दिली. प्रा. मुनिश्वर बोरकर ' एडव्होकेट राम मेश्राम , माजी आमदार डॉ. नामदेव उसेडी,प्रा ' भाष्कर मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली भोजराज कानेकर विलास कोडाप, यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा घेण्यात आली. यात ॲड . राम मेश्राम म्हणाले की ' आमचा लढा हा राजकीय नसुन सामाजीक आहे. समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे त्यासाठी राजकीय बाजु दुर ठेवून s C / s T सामाजाच्या लोकांनी एकत्र आले पाहीजे. माजी आमदार डॉ. नामदेव  म्हणाले की मी राजकीय पदासाठी भांडत नसुन मला माझ्या समाजाचे हित लक्षात घेऊन संविधानाचे उल्लंघन होवू नये बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कठीबद्ध आहे असे त्यांनी म्हटले याप्रसंगी माधवराव गावढ यांनी मार्गदर्शनात वर्गवारी करणे हि असंविधानिक आहे. जाती जाती मधे भेद निर्माण करून फोडा आणि राज्य करा हि रणनितीआहे. परंतु हि रणनिती एससी एसटी समाजाने ओळखून जागृत झाले पाहिजे याप्रसंगी विलास कोडाप संदानद ताराम प्रा. भाष्कर मेश्राम गुलाबराव मडावी, रमेश मडावी ,हंसराज उंदिरवाडे तुलाराम राऊत गौतम मेश्राम प्रशांत मडावी मारोती भैसारे मंदिप गोरडवार बसपा विधानसभा अध्यक्ष, धर्मानंद मेश्राम , ज्ञानेश्वर मुजुमकर तुळसिराम सहारे मालती पुडो मनोहर पोटावी आदिने मनोगत व्यक्त केले . तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचलन भोजराज कानेकर यांनी तर कार्याक्रमाचे आयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सर्वाचे आभार मानले. कार्यकमास कुसमताई आलाम , मिलिंद बाबोळे, दुष्यांत चांदेकर साहेब बसपा नेते,  सुरेखा बारसागडे सुधिर वालदे प्रेमदास रामटेके जिवन मेश्राम रोशन उके अमर खंडारे ' सुरेश कन्नमवार साईनाथ पुगाटी वनिता पदा, मायाताई मोहुर्ले, वेणुताई खोब्रागडे सुमन क-हाडे, हेमंत रामटेके, कैलास खोब्रागडे, अनिल साखरे, फुलझेले, मारोती वनकर, ज्ञानेश्वर वाडके, दुधे साहेब, इत्यादी बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते, आदि सहीत ग्रामसभा परिसर पोटेगाव बांधवा सहीत बहुसंख कार्यकर्ते आदिवासी व बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Aug. 20, 2024   

PostImage

भामरागड घोटाळ्यातील आय.ए.एस.शुभम गुप्ता यांच्यावर " ॲट्रॉसिटी " अंतर्गत गुन्हा …


 

    आय.ए.एस.शुभम गुप्ता यांच्यावर " ॲट्रॉसिटी " अंतर्गत गुन्हा दाखल करा.

 असंवेदनशील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या या प्रयत्नांना हरताळ फासल्या जात आहे.

 

 

गडचिरोली : दुधाळ गाय वाटप घोटाळ्यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता हे दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर गडचिरोलीतील आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गुप्ता यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.१९ ऑगस्ट रोजी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यालय परिसरात शुभम गुप्ता यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भामरागड येथे २०२१ ते २०२३ या कार्यकाळात झालेल्या दुधाळ गाय वाटप घोटाळ्यात प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता हे दोषी असल्याचे आदिवासी विभागाच्या अपर आयुक्तांनी केलेल्या चौकशीत आढळून आले.त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून या ‘आयएएस’ अधिकाऱ्याच्या कारनाम्यांची प्रशासकीय वर्तुळात खमंग चर्चा आहे. 

गडचिरोलीतील आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि पोलीस बॉईज असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, मागास आणि आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन शेकडो कोटी रुपये खर्च करीत असते. मात्र, काही असंवेदनशील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या या प्रयत्नांना हरताळ फासल्या जात आहे

.प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी गाय वाटप योजनेमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला. या प्रकरणाची अपर आयुक्तांनी चौकशी केल्यानंतर गुप्ता दोषी असल्याचे अहवालात नमूद केले आहे. सोबतच या अहवालात लाभार्थी आणि त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. 

गडचिरोलीत कार्यरत राहून कोट्यवधीचा भ्रष्टाचार करणे, आदिवासी समाजातील लाभार्थी आणि कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावणे हा सर्व प्रकार गंभीर आहे. सध्या सांगली येथे महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेले शुभम गुप्ता यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. सोबतच त्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

सात दिवसांत मागण्यांचा विचार न झाल्यास आदिवासी संघटनांनी मिळून देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष,कुणाल कोवे,पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष कोरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली, उमेश उईके,अक्षय मडावी,आरती कोल्हे,विद्या दुगा,मालती पुडो, बादल मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Aug. 20, 2024   

PostImage

मुल तालुक्यातील चिचाळा गावच्या जंगलात एका गुरे राखणाऱ्या इसमाचा वाघाने …


 

   मुल तालुक्यातील चिचाळा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार.

 

मुल : मुल शहराला लागून असलेल्या जंगलात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केला असता गुराखी मूनिम गुरलावर (४५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. वाघाचे हल्ले वाढले असल्याने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुल तालुक्यातील चिचाळा येथील रहिवाशी असलेल्या मुनिम गुरलावार हा गुराखी रविवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी २५ शेळ्या घेऊन मुल शहराला लागून असलेल्या जंगलात गेला होता. सायंकाळी २४ शेळ्या घरी परतल्या. मात्र मुनिम व एक शेळी घरी परत आली नाही. त्यामुळे काही अनुचित घटना घडली असावी असा संशय ग्रामस्थांना आला.

याची माहिती संध्याकाळीच वन विभागाला देण्यात आली. दरम्यान संध्याकाळी ३० ते ४० ग्रामस्थ जंगलात गुराखी मुनिम याचा शोध घेण्यासाठी गेले. तिथे ग्रामस्थांना रक्त सांडलेले दिसले. रात्र भरपूर झाली असल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे ग्रामस्थ गावाला परत आले.

त्यानंतर आज सोमवार सकाळी वन विभागाच्या अधिकारी, पथकाने व ग्रामस्थांनी जंगलात जावून बघितले आता कक्ष क्रमांक ७५२ मध्ये गुराखी मुनिम याचा मृतदेह आढळला. दरम्यान गुरख्याच्या मृत्यूने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या भागात मानव वन्य जीव संघर्ष वाढला आहे. तेव्हा वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मृतक गुराखी मुनिम याचे मागे आई, पत्नी, दोन मुल, बहिण व बराच मोठा परिवार आहे. वन विभागाच्या वतीने मृतक मुनिम याचे कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत दिली आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 18, 2024   

PostImage

RAILWAY TRACK: लोकसभा निवडणुकीवेळी विमानतळाची घोषणा.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रेल्वेची …


     

    गडचिरोली ते बचेली(छतिसगड) रेल्वे सर्वेक्षणाला मंजुरी  सुरजागड प्रकल्प व जिल्ह्याच्या विकासाला चालना.

   

   गडचिरोली : मागास भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीसह छत्तीसगड राज्यात रेल्वेचे जाळे विणून या भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यात माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केलेल्या मागणीनुसार गडचिरोली ते बचेली (छत्तीसगड) मार्गे विजापूर या नवीन रेल्वेमार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. या रेल्वेमार्गासह कोरबा ते अंबिकापूर या मार्गाच्या अंतिम सर्व्हेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

गडचिरोली ते बचेली (मार्गे विजापूर) या 490 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी अंतिम सर्व्हेक्षण आणि डीपीआर तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 16.75 कोटी रुपये मंजूर केले असून या मार्गामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मधील सीमावर्ती भागांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढेल. त्यातून या भागातील विकासात्मक कामांना चालना मिळेल, असा विश्वास मा.खा. अशोक नेते यांनी व्यक्त केला.

कोरबा ते अंबिकापूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने छत्तीसगडच्या उत्तरेकडील दोन प्रमुख शहरे, एनर्जी सिटी कोरबा आणि सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय अंबिकापूर शहर, तसेच त्याच्या आजुबाजूच्या भागांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. ज्यामुळे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीला चालना मिळेल. गडचिरोली ते बचेली (मार्गे-विजापूर) हा नवीन रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील दुर्गम भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडेल. त्यामुळे या भागांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाला चालना मिळेल. यासोबत रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

या दोन्ही प्रकल्पांच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने आता या भागातील सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू होणार असून, त्याआधारे पुढील योजना आखण्यात येणार आहेत. प्रादेशिक विकास आणि एकूणच आर्थिक प्रगतीसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.


PostImage

P10NEWS

Aug. 17, 2024   

PostImage

GOVERNMENT HOSPITAL GADCHIROLI : गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक पदी आदरणीय …


 

   

     गडचिरोली/16:- गडचिरोली जिल्ह्यातील अखेर वादानंतर व भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर डॉ अनिल रुडे यांची हकालपट्टी. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला होता. गडचिरोली जिल्ह्यातील डॉ माधुरी किलनाके यांच्या विषयी जनमानसात चांगली प्रतिमा आहे. आणि अनेक वर्षांपासून त्यांची नियुक्तीची प्रतिक्षा होती. परंतु अखेर गडचिरोली जिल्ह्याच्या  जिल्हा शल्य  चिकित्सक पदी आदरणीय   डॉ. माधुरी किलनाके मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल गडचिरोली जिल्हाभरातुन सर्व नागरिकांकडून हार्दिक शुभेच्छाचे वर्षाव होत आहे. 


PostImage

P10NEWS

Aug. 16, 2024   

PostImage

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने आत्मसमर्पित महिला माओवादी अडकली लग्नबंधनात


 

 

.  गडचिरोली/16:-   सर्वसामान्य गडचिरोलीकर तरुणाने घेतला आत्मसमर्पित महिला माओवादीसोबत लग्नगाठ बांधण्याचा धाडसी निर्णय
.    पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडला.

सविस्तर वृत्त असे आहे की, शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर जे माओवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतात त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोतोपरी मदतीचा हात पुढे करत असते. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 16/08/2024 रोजी मागील वर्षी आत्मसमर्पित झालेली जहाल महिला माओवादी नामे रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचा एलाराम येथील कैलाश मारा मडावी याचेसोबत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने विवाह संपन्न झाला.

सलग 14 वर्षे माओवाद्यांच्या विविध सशस्त्र माओवादी दलममध्ये कार्यरत राहून एरीया कमिटी मेंबर पदापर्यत पोहचलेली जहाल महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी, वय 28 वर्ष रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविल्या जाणा­या योजना व सामाजिक उपक्रमांच्या प्रभावशाली अंमलबजावणीमुळे तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या तीव्र माओवादीविरोधी अभियानांमुळे व हिंसाचाराच्या जिवनाला कंटाळून मागील वर्षी दिनांक 07/10/2023 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. रजनी हिच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकुण 11 लाख रुपयंाचे इनाम घोषित होते.

आत्मसमर्पण केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आत्मसमर्पितांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल करुन घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नीशिल असते. गडचिरोली जिल्ह्रातील शेती करुन सर्व सामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी, वय 26 वर्षे, रा. एलाराम, पोस्ट-पेठा (देचलीपेठा), तह. अहेरी जि. गडचिरोली याने व रजनी या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने पाठिंबा देऊन त्या दोघांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जाण्याकरिता आज दिनांक 16/08/2024 रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थिती आणि पाठींब्याने पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पाडण्यात आला. सदर विवाह सोहळ्याप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  

सदरचा विवाह संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी, नरेंद्र पिवाल व अंमलदार विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.